नालंदा विद्यापीठ माहीती मराठी | Nalanda University information in Marathi
नालंदा विद्यापीठ माहीती मराठी | Nalanda University information in Marathi : नालंदा विद्यापीठ हे भारतातील बिहार राज्यातील नालंदा ह्या जिल्ह्यात असलेल्या राजगीर ह्या ठिकाणी आहे.
नालंदा विद्यापीठ मध्ये केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वश्रेष्ठ बौदध शिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते.
उच्च शिक्षण घेण्यासाठी हे विश्वविद्यालय अत्यंत महत्वपूर्ण मानले जायचे. हे जगातील सर्वात जुने विश्वविद्यालय म्हणून ओळखले जाते.
नालंदा विद्यापीठ माहीती मराठी | Nalanda University information in Marathi | नालंदा विद्यापीठाची माहिती नालंदा विद्यापीठ माहिती | नालंदा विद्यापीठ विषयी माहिती
नालंदा विद्यापीठ स्थापना
नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना पाचव्या शतकाच्या आरंभी झाली असल्याचे सांगितले जाते. बिहार राज्यात असलेल्या राजगीरच्या उत्तरेस ११.२७ किलोमीटर इतक्या अंतरावर हे विद्यापीठ स्थापित करण्यात आले होते.
नालंदा विद्यापीठ स्थापना पाचव्या शतकाच्या आरंभी गुप्त सम्राट सौम्य गुप्त पहिला, कुमार गुप्त ह्यांच्या पुढाकारात करण्यात आली होती.
सम्राट हर्ष यांच्या काळात हे विश्वविद्यालय भराभराटीस आले. प्रारंभी ह्या विश्वविद्यालयाचे नाव 'नलविहार'असे ठेवण्यात आले होते. सम्राट हर्षवर्धन याने विश्वविद्यालयाच्या खर्चासाठी शंभर खेडी दान केल्या होत्या.
हया शंभर खेड्यातील लोक विश्वविद्यालयाच्या खर्चासाठी दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवित असत. तसेच अन्न वस्त्र देखील पुरविण्याचे काम करायचे.
ह्या विश्वविद्यालयात बौदध धम्म तसेच इतर अनेक प्रकारच्या शिक्षण पदधती शिकविल्या जात असे.
हया विश्वविद्यालयात सुमारे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. अणि ह्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी सुमारे दोन हजार शिक्षक अध्यापनासाठी नेमण्यात आले होते. हे त्या काळातील पहिले असे विश्वविद्यालय होते की ज्यामध्ये प्रत्येक पाच विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक विद्यापीठात उपलब्ध होते.
जेथे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत अन्न वस्त्र राहण्याची सोय इत्यादी सुविधा पुरवली जात असे. ह्या विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी फक्त भारतातीलच नव्हे तर भारताच्या बाहेरील कोरिया, जपान, चीन, तिबेट, इंडोनेशिया, फ्रान्स, तुर्की अशा वेगवेगळ्या देशातील विद्यार्थी देखील यायचे. नालंदा विद्यापीठ
येथे सम्राट अशोक आणि हर्षवर्धन यांनी सर्वात जास्त मठ आणि विहार अणि मंदिरे स्थापित केली होती. बाराव्या शतकापर्यंत चांगल्या स्थितीत होता.
पण यात उत्खनन केल्यावर हे समजले की १४ हेक्टर क्षेत्रात ह्या विश्वविद्यालयाचे अवशेष सापडले आहेत. हया विश्व विद्यालयाचा परिसर अनेक चौरस मैल क्षेत्रफळाचा होता.
येथे भव्य अशा इमारती होत्या, तीनशे खोल्यांचे वसतिगृह, ८८ सभागृह, १०० अध्यापन कक्ष अणि ग्रह तारयांचा खगोल शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी उंच मनोरे बांधण्यात आले होते. विश्वविद्यालयाच्या आजुबाजुच्या संपूर्ण परिसरात बागा, तलाव, उपवने होती.
नालंदा ह्या विश्वविद्यालयामध्ये अनेक मजली असलेले धम्म 'मायायोग' नावाचे एक ग्रंथालय होते.
ग्रंथालयाच्या तिन्ही उपविभागास रत्न नगरी, रत्नसागर, रत्नरंजक अशी नावे देण्यात आली होती. यात हजारो ग्रंथ हस्तलिखित होती. इथल्या सर्व इमारतींची निर्मिती ही लाल दगडाने करण्यात आली होती.
अधिक वाचा : गणपती उत्सवातील एक आठवण
नालंदा विद्यापीठ कसे उद्ध्वस्त झाले? बौदध धर्म भारतातुन चीन मध्ये कसा गेला?
नालंदा विद्यापीठ कसे उद्ध्वस्त झाले? बौदध धर्म भारतातुन चीन मध्ये कसा गेला? नालंदा विश्वविद्यालयावर तीन वेळा आक्रमणे झाली होती.
पहिला विनाश स्कंदगुप्त यांच्या शासनकाळात घडुन आला होता. त्यानंतर दुसरा हल्ला गौदास यांनी सातव्या शतकात केला होता.
तिसरा हल्ला जो सर्वात भयंकर हल्ला मानला जातो, तो ११९३ मध्ये तुर्कीच्या बख्तियार खिलजी याने नालंदावर आक्रमण करत नालंदा नगरी पुर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली होती.
एवढेच नव्हे तर त्याने नालंदा विश्वविद्यालयाला आग लावून संपूर्ण विश्वविद्यालयाला देखील जाळुन टाकले होते.
बख्तियार खिल्जी हा भारतात आल्यानंतर त्याची तब्येत खराब झाली असल्याने नालंदा विद्यापीठातील आचार्य राहुल श्रीभद्रा यांच्याकडे उपचारासाठी आला होता.
तिथे बख्तियार खिल्जी याला आचार्यांनी कुराण वाचण्यास सांगितले, कुराणातील प्रत्येक पान वाचता वाचता तो आपोआप बरा होऊ लागला. कारण तो वाचत असलेल्या प्रत्येक पानावर औषध लावण्यात आले होते. जे त्याच्या शरीरात प्रवेश केल्याने तो बरा होत होता.
हे सर्व बघुन खिलजी हैराण होतो, बख्तियार खिल्जी याला ही गोष्ट मान्य नव्हती की इस्लामिक हकीम यांच्या पेक्षा हिंदू धर्मातील भारतीय वेदात अधिक श्रेष्ठ ज्ञान आहे.
दुसरया देशातील धर्मातील व्यक्ती आपल्या पेक्षा एवढ्या पुढे गेले आहे की त्यांचे ज्ञान अणि शिक्षण इतके प्रगल्भ कसे असू शकते! हे खिलजीकडुन पाहीले जात नव्हते.
नालंदा विद्यापीठ कोणी जाळले ?
याचकरीता बख्तियार खिल्जी हयाने ह्या बौदध अणि आयुर्वेदाशी संबंधित ग्रंथ असलेल्या नालंदा विद्यापीठातील ग्रंथालयाला आग लावून दिली.
हयाचवेळी चीन मधील एक फाययान नावाची एक व्यक्ती भारतात आली होती. फाययान भारतातील अनेक मोठमोठे बौदध धम्माचे ग्रंथ घेऊन चीनमध्ये निघुन गेला होता. ज्यामुळे आजही चीनमध्ये बौदध धम्म अखंडपणे चालु आहे.
असे सांगितले जाते की जेव्हा हे विश्वविद्यालय जाळण्यात आले तेव्हा येथील ग्रंथालयात ९० लाखाच्या आसपास इतके विपुल प्रमाणात ग्रंथभंडार होते की जवळपास आग लावल्यानंतर तीन चार महिने हे विश्वविद्यालय जळत होते.
ह्या हल्ल्यात हजारो बौद्ध भिक्षूंची हत्या देखील करण्यात आली होती. त्यामुळे काही बौदध भिक्षु आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी श्रीलंका नेपाळ इत्यादी सारख्या देशात निघून गेले होते.
बख्तियार खिल्जी हयाने बिहार राज्यामधील अनेक मठ तसेच विहार देखील नष्ट केली. आणि लोकांना इस्लामिक होण्यास देखील भाग पाडले.
असे म्हटले जाते की ह्या भयंकर हल्ल्यामुळे बौदध धम्मातील अनेक ग्रंथ साहित्य संपुर्ण जगापासून लुप्त झाली.
आज हे ग्रंथ असते तर बौदध धर्माची प्रगल्भता आपणास समजण्यास अधिक मदत झाली असती. आणि आज आपल्या देशाला इतर देशांपेक्षा विविध क्षेत्रांत गती मिळाली असती.
नालंदा विद्यापीठाचे अवशेष सापडले त्याच्याच जवळपास असलेल्या एका ठिकाणी नव्याने नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ बांधण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या.
याचसाठी नालंदा विद्यापीठ अधिनियम २०१० हा २१ ऑगस्ट २०१० रोजी भारतीय संसदेच्या राज्यसभेने तर २६ ऑगस्ट २०१० रोजी भारतीय संसदेच्या लोकसभेकडुन मंजुर करण्यात आला होता.
ह्या अधिनियमास मंजुरी प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रपती यांच्या संमतीकरीता तो २१ सप्टेंबर २०१० रोजी राष्ट्रपतींकडे पाठवला गेला.
मग राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर २५ नोव्हेंबर २०१० पासुन नालंदा विद्यापीठ कायदा २०१० हा अस्तित्वात आला होता.
यानंतर जपान अणि सिंगापुर सरकारने ह्या विद्यापीठासाठी संयुक्तपणे ४.५ अब्ज डॉलर इतकी मदत देखील देऊ केली होती.
नालंदा विद्यापीठाचे वैशिष्ट्य -
नालंदा विद्यापीठाचे वैशिष्ट्य : नालंदा विद्यापीठ हे जगातील पहिले निवासी विद्यापीठ होते जे आपल्या भारतातील बिहार राज्यात होते. हे जगातील पहिले भव्य विद्यापीठ म्हणून ओळखले जाते.
नालंदा विद्यापीठातील शिक्षणाचे स्तर, येथील वास्तु, संशोधन, ग्रंथालय, शिक्षक, वसतिगृह हे अत्यंत उच्च दर्जाचे अणि समृद्ध असे होते.
सातव्या शतकात ह्या विद्यापीठास भेट दिलेल्या एका चीनी यात्रेकरूने हयुअन त्संग नुसार नालंदा ह्या बौदध विद्यापीठाची स्थापना कुमार गुप्त प्रथम हिंदू सम्राटाने केली होती.
मोफत शिक्षण दिले जात असलेल्या ह्या विद्यापीठात प्रवेश प्राप्त करण्यासाठी देश विदेशातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असायची. विदयापीठात प्रवेश घेऊ इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा विद्यापीठातील विद्वान आचार्य घ्यायचे.
नालंदा विद्यापीठात प्रवेश प्राप्त करण्यासाठी हीनयान, महायान ह्या बौदध ग्रंथांसमवेत उपनिषदे, वेद, तत्वज्ञान, प्रावीण्य प्राप्त करणे आवश्यक असायचे.
नालंदा ह्या विद्यापीठातील अभ्यासक्रमात हीनयान, महायान तत्वज्ञान, वेदाध्ययन, अध्यात्म, व्याकरण, आयुर्वेद, हेतुविदया, सांख्यदर्शन, धर्मशास्त्र, ज्योतिष तसेच पाणिनी सुत्रे इत्यादींचा समावेश करण्यात आला होता.
नालंदा विद्यापीठामध्ये एकुण दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते अणि त्यांना शिकविण्यासाठी दोन हजार पेक्षा अधिक शिक्षक होते म्हणजे फक्त पाच विद्यार्थ्यांना शिकवायला एक शिक्षक ह्या विद्यापीठात उपलब्ध होते.
विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या आर्थिक बाबींची चिंता नसायची कारण नालंदा विद्यापीठात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासोबत खाण्यासाठी अन्न परिधान करण्यासाठी वस्त्र, राहण्यासाठी वसतिगृह, मोफत वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
नालंदा विद्यापीठात आठ वेगवेगळे परिसर अणि दहा मंदिर देखील होते.याचसोबत मेडिटेशन हाॅल अणि वर्ग देखील होते.
एकेकाळी आर्यभट्ट देखील नालंदा विद्यापीठाचे प्रमुख होते.
धन्यवाद नालंदा विद्यापीठ माहीती मराठी | Nalanda University information in Marathi वाचल्याबद्दल!! इतर कुठल्याही विषयाची माहिती जाणून घ्यायची असेल तर कंमेंट करून नक्की कळवा!!