समान नागरी कायदा म्हणजे काय? | uniform civil code in marathi
नमस्कार मित्रांनो,
समान नागरी कायदा म्हणजे काय? Uniform Civil Code म्हणजेच समान नागरी कायदा हे नाव गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही नक्कीच ऐकले किंवा वाचले असेल. 2019 च्या निवडणुकांपूर्वी मोदी सरकारने बरीच आश्वासन दिली होती त्यातीलच हे एक मुख्य आश्वासन होय. पण काही कारणास्तव Article 370 आणि राम मंदिर चे दिलेलं आश्वासन मोदी सरकारने पूर्ण केलं. परंतु समान नागरी कायद्याला झालेला विरोध पाहता, ते काम मोदी सरकारकडून पुढे ढकलण्यात आलं.
आजच्या या लेखामध्ये आपण समान नागरी कायद्याबद्दल संपूर्ण विस्तारित माहिती जाणून घेणार आहोत.
समान नागरी कायदा का पाहिजे ? | समान नागरी कायदा म्हणजे काय ? | uniform civil code in marathi | समान नागरी कायदा म्हणजे | need of uniform civil code
हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे माहिती असणे आवश्यक आहे की कायद्याचे दोन भाग असतात. एक सिव्हिल (दिवाणी ) आणि एक क्रिमिनल (फौजदारी). क्रिमिनल कायद्यामध्ये खून, बलात्कार, दरोडेखोरी इत्यादी गुन्ह्यांचा समावेश होतो. हे कायदे देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी समान आहेत, मग ती व्यक्ती कोणत्याही जाती धर्माची असो. परंतु सिविल कायद्याबाबतीत असे नाही, लग्न, घटस्फोट, विवाह, दत्तक घेणे, वारसा या विषयानुसार प्रत्येक धर्मासाठी हे कायदे वेगवेगळे ठेवण्यात आले. ( समान नागरी कायदा कलम 44, uniform civil code article 44 )
धर्मानुसार वेगवेगळे कायदे का ठेवण्यात आले?
भारतात सर्वात आधी कायदे आणि यांचा उगम हा धार्मिक पुस्तके आणि ग्रंथांमधूनच झाला. हिंदू धर्मियांच्या बाबतीत मनुस्मृति तर मुसलमान धर्मीयांच्या बाबतीत शरिया कायद्याचं उदाहरण घेता येईल. हिंदू आणि मुस्लिम शासकांच्या काळात देखील यामध्ये बदल झाले नाहीत. इंग्रजांनी अशा कायद्यांमध्ये थोडेफार बदल केले जे अगदीच नगण्य होते.
परंतु सर्वच धर्मीयांच्या पर्सनल लॉ मध्ये बरेचसे प्रॉब्लेम होते, अनेक रूढी, परंपरा होत्या विशेषतः स्त्रियांसोबत भेदभाव होणारे कायदे हे सर्व धर्मियांमध्ये होते. स्वातंत्र्यानंतर अशा कायद्यांमध्ये बदल व्हावेत यासाठी मागणी झाली, संसदेमध्ये याबद्दल बरीच चर्चा व वाद विवाद देखील झाला. परंतु अशा कायद्यांमध्ये बदल करणे म्हणजेच धार्मिक हस्तक्षेप करणे अशी समजूत काही वर्गाची होती यामुळे Uniform Civil Code/समान नागरी कायदा ला बराच विरोध करण्यात आला.
पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर उदारमतवादी नेते मंडळी या कायद्यांमध्ये बदल करण्याच्या निर्णयावर ठाम होते. आणि म्हणूनच पुढे हिंदू कोड बिल आणून हिंदुचे कायदे बदलण्याचे प्रयत्न झाले पण याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. परंतु हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 आणि हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 असे कायदे आणून हिंदूंचे लग्न, घटस्फोट, वारसा हक्क, स्त्रियांचा मालमत्तेवरील अधिकार, इत्यादी मध्ये बदल करण्यात आले. या वैयक्तिक कायद्यामध्ये हिंदू धर्मियांबरोबरच जैन, बौद्ध आणि शीख धर्मीय लोकांचा देखील समावेश होतो.
हे ही वाचा -: माहिती अधिकार कायदा २00५
परंतु अल्पसंख्यांक असणाऱ्या मुस्लिम धर्मीय लोकांनी त्यांच्या चालत येणाऱ्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्यास कडवा विरोध केला. त्यामुळे ट्रिपल तलाक सारखा अपवाद सोडला तर बाकी सर्व कायदे हे शरीया कायद्याप्रमाणे चालत आले.
समान नागरी कायदा आणल्यानंतर होणारे बदल | about uniform civil code :-
समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी आणि इतर सर्व धर्मीयांसाठी लग्न, घटस्फोट, वारसाहक्क, मुल दत्तक घेणे, स्त्रियांबद्दल चे कायदे या संदर्भातील कायदे सर्वांसाठी समान राहतील.
कायद्यामध्ये केलेली तरतूद ही सर्व धर्मीयांसाठी बंधनकारक ठरेल. या कायद्याच्या अंतर्गत सर्व जाती धर्मातील लोक हे समान गणले जातील. त्याचबरोबर सर्वांसाठी एखाद्या गुन्ह्याविरोधात समान शिक्षा असेल.
स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि भेदभाव थांबवणे व अल्पसंख्यांक जाती- धर्माच्या लोकांवर होणारे अन्याय थांबवणे, हे देखील समान नागरी कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
अधिक वाचा : कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय ? | Power of Attorney meaning in marathi
समान नागरी कायद्याबद्दलच्या अफवा आणि सत्यता :-
समान नागरी कायद्याबद्दलची सर्वात मोठी चर्चा केली जाणारी गोष्ट अशी मानली जाते की सध्या मुस्लिमांमध्ये असणारी बहुपत्नीत्वाची पद्धत यामुळे बंद होईल, सध्या मुस्लिम समाजातील पुरुष एकावेळी चार लग्न करू शकतो, त्यासाठी कोणताही कायदेशीर अडथळा येत नाही. परंतु हिंदू धर्मीयांमध्ये असे करणे कायद्याने गुन्हा आहे. uniform civil code in family law
समान नागरी कायदा आणल्याने भारतातील कोणत्याही जाती धर्मातील व्यक्तीला एकावेळी फक्त एकाच स्त्रीशी लग्न बंधनामध्ये राहता येईल. त्याचबरोबर घटस्फोट, पोटगी व इतर कायदे देखील सर्व धर्मियांसाठी समान असतील.
समान नागरी कायद्यामुळे आरक्षण बंद होणार का? | समान नागरी कायदा आणि आरक्षण
बऱ्याच लोकांचा हा खूप मोठा गैरसमज आहे, समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा दूर दूर पर्यंत संबंध नाही. समान नागरी कायद्यामध्ये सर्व धर्मीयांच्या पर्सनल कायद्यामध्ये बदल केला जाणार आहे. समान नागरी कायद्याचा नोकरी, शिक्षण व आरक्षणाशी देखील कसलाही संबंध नाही. त्याचबरोबर या कायद्याचा आरक्षणावरती कोणताही परिणाम दिसून येणार नाही.
समान नागरी कायदा म्हणजे काय?
समान नागरी कायद्यामुळे सर्वांना समान टॅक्स भरावा लागेल का?
ही देखील खूपच चुकीची गोष्ट समाजामध्ये पसरवली जात आहे. भारतामध्ये टॅक्स हा आर्थिक उत्पन्नावरून भरला जातो. कोणत्याही धर्मीयांसाठी याच्यामध्ये सवलत दिलेली नाही. त्यामुळे समान नागरी कायद्यानंतर सर्वांना समान टॅक्स भरावा लागेल या गोष्टीमध्ये काहीही तथ्य नाही.
समान नागरी कायद्याला विरोध का ? समान नागरी कायदा म्हणजे काय?
विशेषतः भारतामध्ये भारतीय जनता पार्टी समान नागरी कायदा लागू करण्यावर सर्वात जास्त भर देत आहे. त्याचबरोबर भाजपाची मुस्लिमांसोबत असणारी भूमिका काहींना पटत नसल्याने विरोधकांबरोबरच काही मुस्लिम समाज देखील या कायद्याला विरोध करत आहे.
भारतीय जनता पार्टीचे सरकार हा कायदा पास करू शकते का?
समान नागरी कायदा देशामध्ये पास करण्यासाठी, तसा कायदा प्रत्यक्षात बनवावा लागेल. यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना हा कायदा पास करण्यात येऊ शकेल. परंतु यासाठी देखील लोकसभा आणि राज्यसभा मध्ये बहुमत लागेल, परंतु मोदी सरकारचं केवळ लोकसभेमध्ये बहुमत आहे, राज्यसभेत हा कायदा पास करण्यासाठी त्यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल. जर दोन्ही ठिकाणी बहुमत तयार झालं, तर शेवटी या कायद्यावर राष्ट्रपतींची सही होईल आणि यानंतर संपूर्ण देशामध्ये हा कायदा अमलात आणला जाईल.
समान नागरी कायदा म्हणजे काय ? समान नागरी कायदा आणल्यामुळे, कोणतीही चालत आलेली प्रथा, परंपरा बंद करण्यात येणार नाहीत. फक्त बहुपत्नीत्व व स्त्रियांवर होणारे अत्याचार, भेदभाव होणारे कायदे रद्द करून सर्वांसाठी समान नागरी कायदा लागू केला जाईल.
"समान नागरी कायदा म्हणजे काय? | uniform civil code in marathi" वाचल्याबद्दल धन्यवाद!